"स्पर्धापरीक्षा पास होण्यासाठी टिप्स" ज्या तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवतील
- सकाळी 4 वाजता उठत जा आणि जेवढ्या लवकर अभ्यास करायला बसता येईल तेवढ्या लवकर बसत जा.काही लोक असे असतात. ते म्हणतात कि मी रात्रीचा नमुना आहे. माझा रात्रीच चांगला अभ्यास होतो. पण जेव्हा तुम्ही दिवस भर खुप काही गोष्टी करता त्यामुळे तुमचा जो मेंदू असतो तो खूप थकतो व मेंदूची जी क्षमता असते ती 15 ते 16% वाचलेली असते. स्पर्धा-परीक्षा पास होण्यासाठी तेवढया ताकदीवर अभ्यास करून काहीच नाही होणार.
- सकाळी 4 वाजता उठणे एक मस्त उपाय आहे. रात्रीचे कितीही वाजुदे झोपायला पण सकाळी अलार्म वाजल्या वाजल्या तुम्ही उठून बसणार, सुरवातीला थोडा त्रास होणार पण हळू हळू तुम्हाला सवय होणार.
- डॉ.कलाम जे होते ते त्यांच्या पूर्ण जीवनात 4 वाजताच उठतात. लहानपणी जेव्हा ते 8 वर्षाचे होते तेव्हा ते 4 वाजता ह्यासाठी उठायचे कारण त्यांना पेपर वाटायला जायचे असायच. आणि जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा सुद्धा ते त्याच्या कामाची सुरवात सकाळी 4 वाजेपासून करायचे.आपल्यावर तर तस कुठल्याही प्रकारची जिम्मेदारी नाही आहे. त्यामुळे सकाळी लवकर 4 वाजता उठून अभ्यास केलाच पाहिजे.
- किती वेळ अभ्यास केला पाहिजे ?
- अभ्यास हा तासात नाही होत त्यामुळे कधीही 50 मिनटे अभ्यास करा व 10मिनिटाचा ब्रेक घ्या, अस का तर माणसाचं मेंदू एका वेळेत सलग 50-52 मिनिटाच्या वरती concentrate नाही करू शकत. त्यामुळे एका वेळेत तुम्ही 50 मिनिटे अभ्यास करा व 10 मिनिटाचा ब्रेक घ्या, पण ह्या 50 मिनिटात मोबाईल नाही चालू करायचा लगेच.
- १० मिनिटात काय करणार ?
- 10 मिनिटाचा टाईमर लावा आणि कुठलेही Physical Work करा. झाडू मारा, लादी पुसा, नाचा, जोर काढा, सूर्यनमस्कार घाला, त्या 10 मिन्टामध्ये पण मोबाईल ला बिलकुल हात नका लाऊ, जे हि करायचं हे ह्या 10 मिनटात फक्त Physical Work करा,
- नासा मध्ये सुद्धा जे काही ट्रैनिंग क्लास घेतले जातात. त्यामध्ये ह्याच शेड्युल चा वापर केला जातो. 50 मिनिटे अभ्यास व 50 मिनिटे Physical Work आणि हि गोष्ट तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे कि नासा वाले आहेत ते आपल्यापेक्षा खूपच समजदार आहेत.
- तुम्ही प्रेरणात्मक लेख, गोष्टी, पुस्तके, Motivational video, Inspirational Video बघायला पाहिजेत कारण कधी कधी परीक्षा पास व्हायला 4 ते 5 वर्ष लागतात. लोक नाव ठेवायला लागतात. तेव्हा आत्मविश्वास ढासळतो. त्यामुळे आत्मविश्वास ढासळू नये जिद्द टिकून राहावी त्यासाठी प्रेरणात्मक व्हिडिओ व पुस्तके वाचनेही तितकंच गरजेचं आहे.
- आवळा,मुरंबा खात जा
- जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. ते 7-7 किंवा 8-8 तास एकाच जागेवर बसून अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांचं सगळ्यात पहिले नुकसान होत ते म्हणजे त्यांचं पोट खराब होत. जर तुम्ही आवळ्याचा मुरंबा खाता तर कधीपन जीवनात तुमचा पोट खराब नाही होणार. आवळ्या मध्ये व्हिटॅमिन C हे जास्तीत जास्त प्रमाणात असतात. जे प्रत्येक प्रकारच शारीरिक व मानसिक थकावटिला दूर करत,
- मुरंबा:
- जो असली मुरंबा असतो तो मधापासून बनतो आणि मध असत ते उत्तम source आहे fructose साठी. आपला जो मेंदू असतो तो fructose वरच चालतो. मध जे असत ते एक प्रकारे तुमच्या मेंदूला एक उत्तम प्रकारची शक्ती देत असतो. आवळ्याच्या मुरम्बामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. आणि त्यामुळे आपला Concentration पॉवर हि वाढते त्यामुळे जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमचं जे लक्ष आहे ती बिलकुल विचलित नाही होणार.
- अशा करतो तुम्हाला दिलेली "स्पर्धापरीक्षा पास होण्यासाठी टिप्स" माहिती नक्कीच आवडली असेल.
- तुमचा अमूल्य वेळ दिल्याबदल धन्यवाद,
टिप्पणी पोस्ट करा