"मोबाईल बॅटरीची काळजी कशी घ्याल उपाय"
जाणून
घ्या आजच्या SMARTPHONE MOBILE
BATRY
विषयी
* आजकाल सगळ्या मोबाईलच्या बॅटऱ्या ज्या असतात.
त्या सील्ड असतात. त्यांना आपण बाहेर काढू नाही शकत. तुम्हाला जर मोबाईल ची बॅटरी
काढायची असेल तर तुम्ही नाही काढू शकत खराब झाली तर सर्व्हिस सेंटर शिवाय दुसरा
पर्याय नसेल. अशा परिस्थिती खूप महत्वाच असत कि तुम्ही तुमच्या मोबाइलची बॅटरी
घेणं खूप गरजेचं असत. सर्विस सेंटर ला नेण्यापेक्षा काळजी घेणं परवडत.
* सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईल मधली जी वस्तू
खराब होते ती बॅटरीच असते. बाकी रॅम,रॉम,डिस्प्ले,इतर
सर्व काही ते ठीक ठाक चालत. मोबाईल हा तुमचा 10 ते 15
वर्ष चांगला चालू शकतो पण बॅटरी हि तुम्ही नॉर्मल वापरली तरी खराब होण्याचे
चान्सेस नाकारता येत नाही.
MOBILE
BATRY च
आयुष्य कस वाढवाल ?
* तुम्ही तुमच्या मोबाइलला 0%
पासून तर बॅटरी 100% अशी कधीच चार्जिंग करत जाऊ नका. नॉर्मल
चार्जिंग लावत जा 30% चार्जिंग असेल तर चार्जिंग ला लावत जा तीही 100%
नका करू पूर्ण. 80 ते 85% करा.
* जस माणूस सगळं एकदाच खात नाही तस बॅटरीच्या
बाबतीतही आहे.
CHARGER कुठला वापरावा वापरू नये ?
* तुमच्या मोबाईल सोबत जो चार्जर भेटलाय तोच
वापरत जा. जर तुम्ही दुसरा चार्जर वापरत असाल तर त्याचा जो आउटपुट व्होल्टेज असतो
तो तुमच्या चार्जर इतका सेम पाहिजे. चार्जर आउटपुट व्होल्टेज हा चार्जर सॉकेट वर
लिहिलेला असतो. बाकीच्या गोष्टीं नाही बघितल्या तरी चालतील कारण तुमचा फोन तेवढच
घेईल जेवढं त्याला पाहिजे. ज्या मोबाईलला फास्ट चार्जर आहे हे त्यांनी स्लो चार्जेर वापरला
तरीही चालेल तुमच्या मोबाईल ला काही प्रॉब्लेम होणार नाही.
0% BATRY कधी व का करावी ?
* तुमचा मोबाईल जर कधीच 0% राहत नसेल तर
तुम्ही 60 दिवसातून एकदा तरी त्याला पूर्ण 0 % बॅटरी उतरून
पुन्हा चार्ज करा. तस केल्याने बॅटरी जी आहे ती पूर्ण पणे रिफ्रेश होईल.
BATRY च आयुष्य किती असत व किती टिकू शकते ?
* मोबाईल असो किंवा लॅपटॉप त्याला तुम्ही जास्तीत
जास्त 1000 वेळा रिचार्जसायकल करू
शकता. रिचार्ज सायकल म्हणजे चार्जिंग-वापरणे कमी झाल्यावर- चार्जिंग याला रिचार्ज
सायकल म्हणतात.
* बॅटरी जास्तीत जास्त 3 किंवा 4
वर्षे व्यवस्थित चालू शकते, कदाचित त्यानंतरही चालेल पण तिचा
परफॉर्मन्स थोडा कमी होईल,
BATRY PERRFORMANCE कमी झाला तर,
* एक वेळ असा येतो कि तुमची बॅटरी खूपच लवकर
संपते त्यावेळी तुम्ही सर्विस सेंटर मध्ये जा आणि बॅटरी बदलून घ्या.
रात्रभर
चार्जिंगला लावला तर धोका आहे का नाही जाणून घ्या ?
* तुमच्या मोबाईल ला तुम्ही रात्री चार्जिंगला
लाऊन झोपला व सकाळी पर्यंत चार्जिंगला लावल तरी तुमच्या मोबाईल मधली बॅटरी खराब
होत नाही. कारण त्या मध्ये अशी टेक्नॉलॉजीचा (OVERCHARGED-PROTECTION)वापर
करण्यात आला आहे कि * OVERCHARGED-PROTECTION: तुमचा मोबाईल 100 % चार्ज झाला ऑटोमॅटिक चार्जिंग डीसेंबल्ड
प्रोसेस नुसार चार्जिंग प्रोसेस आपोआप बंद
होते. (हा जेव्हा नोकियाचे ते जुने मोबाईल होते त्यांना हा प्रॉब्लेम होता. जर
त्यांची चार्जिंग रात्रभर लावलीतर फुटण्याचा धोका होता)
* आशा करतो तुम्हाला दिलेली "मोबाईल बॅटरीची काळजी कशी घ्याल उपाय " माहिती आवडली असेल, तुमचा अमुल्य वेळ
दिल्याबद्दल धन्यवाद..!
टिप्पणी पोस्ट करा